सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारासाठी बार्शीच्या सामाजिक क्षेेत्रात कार्यरत असलेल्या मातृभूमी प्रतिष्ठान बार्शीची सामाजिक संस्था गटातून तर, वैयक्तिक गटात दलित चळवळीतील कार्यकर्ते श्रीधर कांबळे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून, आज १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे सायंकाळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंढे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
शासनाने २०१७-१८ व १९१८-१९ या दोन वर्षाचे पुरस्कार जाहीर केले आहेत. मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी ही संस्था गेल्या चार वर्षापासून बार्शी शहर व तालुक्यात सामाजिक काम करीत आहे. यामध्ये तालुक्यातील विविध गावात शुध्द पाणी प्रकल्प बसवणे, शासनाच्या आरोग्य योजनेत न बसणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी शासकीय मदत मिळवून देणे यासह विविध सामाजिक कामे प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष संतोष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली १५० सभासद व संचालक करत आहेत. शासनाने या कामाची दखल घेऊन प्रतिष्ठानची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पन्नास हजार रुपये ,स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरुप आहे.
श्रीधर कांबळे हे शिक्षक म्हणून कार्यरत असून, विद्यार्थी दशेपासून ते नामांतर चळवळ, मंडल आयोग, खैरलांजी, भूमिहीन चळवळ, घरकुल योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती आदीसह विविध आंदोलनात सहभागी होते आहेत. २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून, आज १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे सायंकाळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंढे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.