बहुजननामा ऑनलाईन टीम – हवामान विभागाने भारतातील १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. देशात पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केला आहे. गुजरातमधील बडोद्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून अजूनही पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावर आहे. तशीच परिस्थिती मुंबई मध्येही आहे. मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे रस्त्यांवर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. राजधानी दिल्लीत देखील पावसाने कहर केला असून पुढील दोन तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
#WATCH Maharashtra: Streets waterlogged & houses submerged in water, after heavy rainfall in Palghar. pic.twitter.com/Z32Jj1htaM
— ANI (@ANI) August 3, 2019
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, गाजियाबाद, उत्तरप्रदेशमधील मोदी नगर, फरिदाबाद, चपरौला, सोहाना, पलवल, बिजनौर, रुडकी, गुलोठी, जहांगिराबाद, अलिगढ, बुलंदशहर, अमरोहा अंडी आजूबाजूच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलाय आहे. पुढील दोन दिवसात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच किनारपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबतच राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि ओडिशामधील काही भागांत देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान किनारपट्टीवरील तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, चंडीगढ, पंजाब, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणांत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.