वाराणसी : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जिंकवून आणण्यासाठी बाहेरच्या गुंडांकडून स्थानिक नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपावर केला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत हा आरोप केला आहे की, वाराणसीमध्ये कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना जिंकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वाराणसीतील गल्लीबोळात तसेच घरांमध्ये जाऊन पहिल्यांदा आमिष दाखवून नंतर धमकी दिली जात आहे. त्यामुळे तेथील निवडणूक स्वतंत्र्य आणि निष्पक्ष कशा होणार? बंगालप्रमाणे निवडणूक आयोगाचे वाराणसीमध्ये लक्ष का नाही? असा सवाल मायावती यांनी उपस्थित केला आहे.
तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता. तसेच निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप लावला असून निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं त्यांनी म्हटले होते. तसेच ,’सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे.
पीएम श्री नरेन्द्र मोदी को वाराणसी में हर हाल में जितवाने की कोशिश में वहाँ के हर गली-कूचे व घर-घर में जो बाहरी लोगों के माध्यम से पहले लालच और फिर धमकी आदि दी जा रही है उससे वहाँ मतदान स्वतंत्र व निष्पक्ष कैसे हो पाएगा? चुनाव आयोग की, बंगाल की तरह, वाराणसी पर नजर क्यों नहीं है?
— Mayawati (@Mayawati) May 17, 2019