बहुजननामा ऑनलाइन टीम – जगासह भारतात देखील कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. असं असताना देखील राम मंदिराच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय राजकारण देखील चांगलंच तापत आहे. एकीकडे राजस्थानमधील सत्तापेच काँग्रेसला मोठे आव्हान म्हणून उभे आहेच. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांच्यात चांगलेच वाक्ययुद्ध रंगले आहे.
आयोध्यामध्ये 5 ऑगस्टला राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. शरद पवार म्हणाले होते की,” काही जणांना असं वाटतंय की राम मंदिर बांधल्यावर कोरोना जाईल.” अशी खोचक टीका पवार यांनी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्या उमा भारती म्हणाल्या की, “शरद पवार हे रामद्रोही असून हे त्यांचं वक्तव्य मोदी विरोधात नसून रामाच्या विरोधात आहे.”
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत राम मंदिराच्या भूमीपूजनाची 5 ऑगस्ट ही तारीख काढली गेली आहे. याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील दिलेलं आहे.
"शरद पवार का ये बयान रामद्रोही है। मोदी जी के खिलाफ नहीं, राम के खिलाफ है": बीजेपी नेता उमा भारती NCP नेता शरद पवार की टिप्पणी पर (हम सोच रहे हैं कि कोरोना वायरस के खिलाफ लड़ाई कैसे लड़ी जाए जबकि कुछ लोगों को लगता है कि कोरोना मंदिर बनाकर जाएगा) pic.twitter.com/bHippNe3zl
— ANI_HindiNews (@AHindinews) July 20, 2020
दुसरीकडे भारतात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होताना दिसतोय. भारतातील कोरोनाचा आकडा 11 लाखाच्या वर गेलेला असून सध्या 3 लाख 90 हजार ऍक्टिव्ह केस आहेत. अशी स्थिती असताना मंदिरांपेक्षा आरोग्यव्यवस्था बळकट करणं महत्वाचं असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं.