बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात दोन्ही समर्थकांमध्ये वॉर सुरु आहे. त्यातच एका माजी नौदलाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्या विरोधात संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कथित मारहाण प्रकरणावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं केलं असून हे निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबर ही तर राज्यपुरस्कृत दहशत असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. ते बिहारमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हा गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर सहा लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. जर असा प्रकारे गोष्टी घडत असतील तर अशा प्रकारचं वातावरण महाष्ट्रात यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं, असे फडणवीस म्हणाले.
It's very wrong & kind of 'state-sponsored terror' situation. I called upon Uddhav ji through my tweet to stop goonda raj. 6 accused were released in 10 minutes: Former Maharashtra CM Devendra Fadnavis on retired Navy officer who alleged he was beaten up by Shiv Sena workers pic.twitter.com/OllXoIxzzS
— ANI (@ANI) September 12, 2020
पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खरचं काश्मीरसारखं वातावरण होत आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे खूपच पुढारलेले राज्य आहे. तिथली जनता सुज्ञ आहे. त्यामुळे तिथे काश्मीरसारखी वगैरे स्थिती निर्माण होणार नाही.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून कंगनावर केलेल्या टिपण्णीवर विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, सामना हे शिवसेनेचं वृत्तपत्र असून त्यातून शिवसेनेचं म्हणणं मांडलं जातं. शिवसेनेला जर असं वाटत असेल की कंगना पाण्यात राहून मगरीशी वैर करत आहे तर हा शिवसेनेचा अहंकार बोलत आहे. लोकांना अहंकार आवडत नाही. जेव्हा सत्ता अहंकारी होते तेव्हा तिचे पतन होतं आणि राज्यात सध्या तेच दिसत आहे.