बहुजननामा ऑनलाइन टीम – माजी भाजप ( BJP) नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP) प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, असे विधान खडसे यांनी मुक्ताईनगरमधील ( Muktainagar) एका कार्यक्रमात केले. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करताना ते म्हणाले कि हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला असल्याचे देखील खडसे यांनी यावेळी म्हटले.
भाजपचे जेष्ठ नेते असणाऱ्या एकनाथ खडसे यांनी माजी मुखमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत भाजपला सोडचिट्ठी दिली होती. २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर त्यांच्यावरआरोप झाल्यानंतर मंत्रिपद काढून घेतल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली होती. दरम्यान, या नाराजीची पक्षाने दखल न घेतल्याने अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. विविध ठिकाणी ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर मी संपूर्ण जीवन पक्षासाठी खर्च केलं. एकनिष्ठ राहीलो. मात्र मला एका माणसानं छळलं, असा आरोपही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.