औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – एमआयआम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक एमआयएम स्वबळावर लढवणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत घोषणा केली आहे. जागावाटपावरून वंचित आणि एमआयएमचं बिनसलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एमआयएमने 95 जागांची मागणी केली होती. परंतु एवढ्या जागा देणे शक्य नसल्याचे आंबेडकरांनी सांगितले. जागावाटपावरून आता दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली आहे. त्यामुळे दोन्हीही पक्ष आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, एकूण जागा, आघाडीतील मित्रपक्ष कोण याबाबतचे काम अंतिम टप्प्यात आहे असं वक्तव्य नुकतंच आंबेडकरांनी केलं होतं.
आंबेडकर म्हणाले होते की, “काँग्रेससोबत आघाडी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. परंतु 144 पेक्षा अधिक जागा आम्ही काँग्रेसला देणार नाही. याबाबत अंतिम भूमिका पुढील आठवड्यात जाहीर करू. आमच्या संभाव्य आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार नाही. राष्ट्रवादीची मते काँग्रेसला परावर्तित होत नसल्याचे काँग्रेसवालेच म्हणतात. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे काहीच कारण नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले होते.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी