मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने घवघवीत यश मिळवले आणि नुकताच मोदी सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला त्यात अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित होती .मोदी सरकारच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेचा पास देण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार या शपथविधीला गेले नाहीत अशी चर्चा रंगली असून यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, कोणाला कुठे बसवण्यात यावे याचा प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला आहे तो प्रोटोकॉल भाजपा सरकार पाळत नाही ही सत्य परिस्थिती आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
मोदी सरकारने घेतलेल्या कालच्या शपथविधीला पवारसाहेब गेले नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. परंतु सरकारची जबाबदारी आहे की, प्रत्येक महत्वाच्या नेत्याचा जो प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे जागा दिली पाहिजे. शपथविधीला ८ हजार लोकांना बोलवले होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण आपल्या देशात लोकशाही असून शरद पवार हे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसंच माजी ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा प्रोटोकॉल आहे’, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
भाजपा सरकारला यामध्ये कोण प्रमुख वाटतं. अंबानी, अदानी यांना पुढे बसवायचं आहे की, या देशात ज्यांना अधिकार त्यांना पुढे बसवायचे आहे अशा संतप्त सवालही नवाब मलिक यांनी सरकारला केला.हे मोदी सरकारने जाणून बुजून केले असल्याचे टीकाही मलिक यांनी केली