आ. जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणावर हायकोर्टाने कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही. केंद्र सरकारने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासांना १० टक्के विशेष आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. तशाच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा. मराठा समाजाचे बिल पाठवून त्यांना १६ टक्के आरक्षण मिळवून द्यावे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी तातडीने फडणवीस यांनी पाठपुरावा करावा. मराठा आरक्षण जाहीर झाले त्याचवेळी आपण विधिमंडळात अशा पद्धतीने आरक्षण देणे चुकीचे आहे. कारण ते न्यायालयात टिकणार नाही, असे आपण म्हटले होते. जोपर्यंत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्यात दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. राज्य सरकार तसा पाठपुरावा करणार नसेल तर आगामी निवडणुकीत मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आपण याचा जाहीर निषेध करतो. न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना सरकारने तशी भूमिका घेणे हा समाजाला हुलकावणी देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सरकारने थेट स्थगितीऐवजी न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नवीन सुधारित आदेश जारी करावा, अशी अपेक्षाही आ. जाधव यांनी व्यक्त केली आहे..
आ. जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणावर हायकोर्टाने कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही. केंद्र सरकारने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासांना १० टक्के विशेष आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. तशाच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा. मराठा समाजाचे बिल पाठवून त्यांना १६ टक्के आरक्षण मिळवून द्यावे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी तातडीने फडणवीस यांनी पाठपुरावा करावा. मराठा आरक्षण जाहीर झाले त्याचवेळी आपण विधिमंडळात अशा पद्धतीने आरक्षण देणे चुकीचे आहे. कारण ते न्यायालयात टिकणार नाही, असे आपण म्हटले होते. जोपर्यंत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्यात दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. राज्य सरकार तसा पाठपुरावा करणार नसेल तर आगामी निवडणुकीत मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आपण याचा जाहीर निषेध करतो. न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना सरकारने तशी भूमिका घेणे हा समाजाला हुलकावणी देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सरकारने थेट स्थगितीऐवजी न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नवीन सुधारित आदेश जारी करावा, अशी अपेक्षाही आ. जाधव यांनी व्यक्त केली आहे..