बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र(The Maharashtra ) सरकारच्या गृह मंत्रालयाने 40 सदस्यीय टीमचे गठण केले होते. गृह विभागाने कोंकण विभागाचे महानिरीक्षक संजय मोहिते यांच्याकडे(The Maharashtra ) नेतृत्वाची जबाबदारी सोपवली होती. अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (4 नोव्हेंबर) मुंबई येथील त्यांच्या घरातून अटक केली होती.
मुंबई आणि रायगडच्या पोलिसांचा सहभाग
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, रायगड पोलिसांनी इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांच्या आत्महत्यांचा तपास पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळताच काही दिवसातच ’ऑपरेशन अर्णब’ची तयारी सुरू करण्यात आली होती. या ऑपरेशनमध्ये मुंबई आणि रायगड पोलिसांच्या 40 कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला होता.
सचिन वाझे यांच्याकडे अटकेची जबाबदारी
संजय मोहिते यांनी अर्णब यांना अटक करण्याच्या योजनेचा आराखडा तयार केला, तर याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हाय-प्रोफाइल एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आली. मोहिते यांच्या नेतृत्वाखालील टीमसाठी अर्णबला अटक करणे एक आव्हानात्मक काम होते. टीमच्या एका सदस्याने टाइम्स ऑफ इंडियाशी चर्चा करताना सांगितले की, आम्ही खुप सावधानी बाळगून काम केले. टीमच्या प्रत्येक सदस्याने संयमाचे पालन केले.
छोट्या-छोट्या मुद्द्यांकडे ठेवले लक्ष
टीमच्या सदस्याने सांगितले की, सुरूवातीच्या तपासात हे सिद्ध झाले की, अर्णब कथितरित्या आत्महत्येत सहभागी होता. सदस्याने सांगितले, हे एक गुप्त ऑपरेशन होते आणि आमच्या लोकांनी यासाठी अर्णबच्या घरासमोर अनेक फेर्या मारल्या होत्या. आम्हाला भिती होती की, बातमी लिक झाली तर अर्णब अटकेपासून वाचण्यासाठी शहराच्या बाहेर जाऊ शकतो. हे एक योजनाबद्ध ऑपरेशन होते आणि छोट्या-छोट्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. हे अगोदरच ठरवण्यात आले होते की, दरवाजा कोण ठोठावणार, कोण अर्णब आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणार आणि जर त्याने विरोध केला तर कोणती कारवाई करायची.
2 वर्ष जुन्या प्रकरणात झाली अटक
अर्णब गोस्वामी यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या दोन वर्ष जुन्या केसमध्ये अटक केली होती. यानंतर सायंकाळी उशीरा अर्णब गोस्वामी यांना रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात आले, जेथे कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. मात्र, अर्णबच्या वकिलांनी जामीन याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, कलम 306 आणि 34 अंतर्गत अर्णब यांना अटक करण्यात आली. सुसाईड केसमध्ये अर्णब गोस्वामी यांच्याशिवाय फिरोज मोहम्मद शेख आणि नितेश सारडा सुद्धा आरोपी आहेत, ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
5.4 कोटी रूपयांचे बिल बुडवले
अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी कथित प्रकारे बिलाची थकबाकी न दिल्याने 53 वर्षीय एक इंटीरियर डिझायनर आणि त्यांच्या आईने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी सीआयडीद्वारे पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले होते. कथित प्रकारे अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये म्हटले होते की, आरोपींनी त्यांचे 5.40 कोटी रूपयांचे बिल दिले नाही, यासाठी त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले. मात्र, रिपब्लिक टीव्हीने हे आरोप फेटाळले होते.