बहुजननामा ऑनलाईन टीम – जगातील सर्वात मोठा विकसनशील देश म्हणून भारताची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महात्मा गांधी स्वच्छता अभियाना अंतर्गत राबविलेल्या कार्यामुळे सध्या देशात स्वच्छता अभियान जोरात सुरु आहे. या अभियानाअंतर्गत देशवासियांनीही आपला सहभाग नोंदवला आहे. याअंतर्गत प्रत्येक जण आपल्या शहराला स्वच्छ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये अलीकडेच भारताच्या गृहमंत्रालयाने भारतातील सर्वात १० स्वच्छ आणि १० अस्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. जाणून घेऊ या यादीतील ५ स्वच्छ शहरांबाबत
१. इंदोर
या यादीत सर्वात प्रथम स्थानी इंदोर हे शहर आहे. भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोरची आता ओळख आहे. सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोरचा गौरव करण्यात आला.
२. भोपाळ
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून या शहराला पुरस्कार मिळाला आहे.
३. विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम हे शहर समुद्रकिनारी असल्याने आपल्या निसर्गसौंदर्यासाठी तर ओळखले जाते आता स्वच्छतेसाठीही या शहराची ओळख होणार आहे. या यादीत विशाखापट्टणम हे तिसऱ्या स्थानावर आहे.
४. सुरत
भारतातील आणि गुजरातमधील सुरत हे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला या यादीत चौथे स्थान देण्यात आले.
५. म्हैसूर
म्हैसूर हे शहर आपल्या स्वच्छतेसाठी संपूर्ण जगात आता प्रसिद्ध होणार आहे. म्हैसूर या शहराला या यादीत पाचवे स्थान देण्यात आले आहे.