पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीत रिपाइं सहभागी आहे. युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यावर रामदास आठवले यांनी शिक्कामोर्तब केले आहे. पण नेमका कोणाचा आदेश पाळून प्रचार करायचा यावरून रिपाइंच्या कार्यकर्त्याचा वाद चव्हाट्यावर आला आहे. रिपाइंचे प्रमुख रामदास आठवलेंचा आदेश न मानण्याचे वक्तव्य करणारे भाजप कोट्यातील रिपाइंचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी रिपाइंचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत यांनी केली आहे.
गेल्या निवडणुकांपासून भाजप-रिपाइंची युती होती. या युतीमुळेचं बाळासाहेब ओव्हाळ हे भाजपच्या कमळ या निवडणुक चिन्हावर निवडून आले आहेत.परंतु लोकसभा निवडणुकीत आमदार लक्षमण जगताप सांगतील . त्याचेच काम करू रामदास आठवले यांच्या राजकीय भूमिकेशी माझा कुठलाही संबंध असणार नाही. या ओव्हाळ यांच्या वक्तव्याला बाळासाहेब भागवत यांनी आक्षेप घेतला आहे.
ओव्हाळ यांची कोणतीही ओळख नसताना युतीमुळे ओव्हाळ यांना रिपाइंच्या आठवले गटाच्या कोट्यातून भाजपची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आठवले साहेबांबाबत बोलण्यापुर्वी त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी भागवत यांनी केली आहे.