मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावर आपली भूमिका मांडली. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिकार आहे. त्यांनी वेगवेगळ्या मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा केली. तर हा विषय गंभीर आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असं स्पष्ट मत अजित पवार यांनी केलं आहे. त्यावेळी ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणतात, परमबीर सिंग यांच्या प्रकरणावर सर्वाच्च न्यायालयाने,उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री सगळ्यांसह चर्चा करत आहेत. जनतेला विनंती, काही दिवसांत वातावरण निव्वळले जाईल. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, तसेच बदल्या ह्या एका सांगण्यावरून झाल्या नाहीत, समितीने सांगितल्या त्यानुसार बदल्या झाल्या आहे. कॅबिनेट बैठकीत फोन टॅप प्रकरणावर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती मुख्य सचिवांना (Chief Secretary) दिल्या आहे. याबद्दलचा एक अहवाल दिला जाईल. आज मुख्यमंत्री यांनी राज्यपाल कोश्यारी यांना वेळ मागितला होता. महाविकास आघाडी नेते भेटणार होते परंतु राज्यपाल बाहेर असलयाने नंतर भेटतील ,अशी माहिती अजित पवारांनी दिली.
पुढे ते म्हणाले, पोलीस दलातील बदल्यांबाबत जे रॅकेट आहे त्यांची नावं समोर येईल. ती किती खरी आहे ते तपासून पाहिले जाईल. ज्या बदल्यांबाबत आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सांगितले त्या बदल्या झालेल्या नाही. महत्वाची पदं कुणाला दिली नाही, जे कुणी या प्रकरणात आहे त्यांची चौकशी केली जाईल. बदल्यांचे रॅकेट पूर्ण माहिती घेऊन कट आहे का? वैयक्तिक कारण आहे? या सर्व बाजूने याचा तपास केले जाईल असे ते म्हणाले. तसेच ‘महाविकास आघाडी सरकार हे बहुमतात आहे, विरोधक सरकार बरखास्त करण्याची मागणी करत असले, तरी पोलीस दलातील काहीजण सरकार पाडण्याबाबत प्रयत्न करत आहे हे उघड होत आहे, तर राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थितीत आहे. पोलीस खात्यातील काही जणांनी केलेली चूक गंभीर आहे, तपास यंत्रणा योग्य तो तपास करून कारवाई करतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.