बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्य सरकारने केवळ दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन घेतल्याने त्यावरून भाजपाचे नेते नारायण राणे यांनी सरकावर निशाणा( fault of Mahavikas Aghadi ) साधला आहे. राज्य सरकारला शेतकरी, आरोग्य, शिक्षण, मराठा आरक्षणाचा प्रश्न याबाबत कोणतीही चर्चाच करायची नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन फक्त दोनच दिवस ठेवल्याची टीका राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी कुडाळ येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्य आर्थिक संकटात आहे. राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे नेण्याचे सरकार करत आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक 48,000 जणांचा कोरोनामुळ मृत्यू झाला आहे. हे पाप आताच्या महाविकास आघाडी सरकारचे आहे. कोरोना काळात या सरकारने काय उपाय योजना केल्या आहेत, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या पदरी अपयश- नारायण राणे
राणे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या पदरी अपयश आले आहे. याला राज्य सरकारच जबाबदार आहे. सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडता आली नाही, असे राणे यांनी सांगितले. तसेच मराठा आंदोलनाला या सरकारने बळजबरीने दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे दुष्परिणाम राज्यात उमटतील आणि त्याला हे सरकार जबाबदार असेल असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात त्याचबरोबर नोकरीत आरक्षण मिळाल होते. ते देखील सरकारला टीकवता आले नाही. सरकारला मराठी आरक्षणावर बोलायच नाही, म्हणून हिवाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसाचे घेण्याचा घाट घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजाचे राज्य दिवाळखोरीत काढण्यात येत आहे. याला सरकारमधील मंत्री जबाबदार असल्याचे राणे यांनी सांगितले.