नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – देशात निवडणुकीची धामधुम सुरु असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करताना दिसत आहेत राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील फिसकटली होती. मात्र जरी युती झाली असती तरी याचा राजकीय फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असता, असं मत केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे .दिल्लीच्या चांदणी चौक मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत
दिल्लीसाठी लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत या सर्वाच्या सर्व लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचा विजय होईल. तसेच काँग्रेस आणि ‘आप’पेक्षा भाजप अधिक पुढे राहिल. भाजपचा विचार करता, काँग्रेस आणि आप सोबत आले असते, तर त्याचा सर्वाधिक आनंद मलाच झाला असता. असो , काहीही झालं तरी भाजपच विजय होणार असल्याचा विश्वास हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या तोंडावर गेल्या अनेक दिवसांपासून आप आणि काँग्रेस यांच्यात युतीच्या चर्चा सुरू होत्या. परंतु शेवटपर्यंत ही युती होऊ शकली नाही. दिल्लीच्या राजकारणात कोण सत्तेची गादी राखतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .