शिरूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील चार टप्प्यातील निवडणूका संपल्या आहेत आहेत परंतु अजून देशात अजून तीन टप्प्यातील निवडणूक बाकी असून आचारसंहिता लागू आहे एका लग्नपत्रिकेत नगरमध्ये सुजय विखेंच्या नावापुढे निकालाआधीच खासदार लावल्याची घटना समोर आली आहे एक लग्नपत्रिका सोशल मीडियात व्हायरल होत आहे.यावर शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आपल्या विजयाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्यात हजेरी लावली. त्यांना घटनास्थळी पोहचण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी ‘विद्यमान खासदारांच्या पुणे-नाशिक महामार्गाच्या प्रलंबित कामामुळे आपण उशिरा पोहचलो, असं म्हणत सुरुवातीला कोल्हे यांनी शिवसेना खासदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना टोला लगावला. त्यानंतर ‘निकाली कुस्तीत आपली ताकद दिसेलच पुढच्या वर्षी परिस्थिती वेगळी असेल. नारायणगावच्या यात्रेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल,’ असं म्हणत पुढच्या यात्रेत याठिकाणी खासदार म्हणून आपणच असू असा आत्मविश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला.