नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशा येथे मंगळवारी बकरीच्या मृत्यूमुळे एका कंपनीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. इतकेच नाही तर कंपनीसह राज्याच्या तिजोरीलाही ४६ लाख रुपयांचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, महानदी कोलफील्ड्स लिमिटेड कंपनीच्या कोळसा वाहणाऱ्या गाडीच्या धडकेत बकरीचा मृत्यू झाला.
या बकरीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एवढी मोठे आंदोलन सुरू केली की एमसीएलला २.६८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. बकरीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी कंपनीकडे 60 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरवात केली,असे कंपनीने सांगितले आहे. गोंधळानंतर सोमवारी सकाळी 11 वाजेपासून तालचेर कोळसा क्षेत्रात कोळसा वाहतुकीचे काम थांबविण्यात आले.
पोलिसांच्या हस्तक्षेपाच्या अडीच तासानंतर हे काम पुन्हा सुरू केले गेले. कामाच्या व्यत्ययामुळे एमसीएलला अंदाजे २.६८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासह काम थांबल्याने सरकारी तिजोरीलाही ४६ लाख रुपयांचे नुकसान झाले.
Visit : bahujannama.com