मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –‘अमित शहा आणि कंपनीने ठाकरे कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप केले आहेत. परंतु त्यांच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही, फडणवीस यांच्याकडून मला हि अपेक्षा नव्हती, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली . दरम्यान मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत शिवसेनेवर काही आरोप केले आहेत. अडीच – अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद असं काही ठरलं नव्हतं असे मुख्यमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांच्या या आरोपणाचे खंडन केले आहे.
‘फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु त्यांच्याकडून हि अपेक्षा नव्हती, त्यांनी आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप केले आहेत. ही पहिली वेळ आहे, जेव्हा कोणीतरी ठाकरे कुटुंबावर आरोप केले आहेत. तरी एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री नक्कीच होईल,असे वचन मी शिवसेना प्रमुखांना दिल होत. त्यामुळे त्यांना दिलेलं वचन मी पाळणार आहे. त्यासाठी मला अमित शहा आणि कंपनीची गरज नाही, असेही शिवसेना प्रमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि, दरम्यान अडीच -अडीच वर्षांचं ठरलं नव्हतं असे फडणवीस यांनी म्हंटल, त्यामुळे शब्दांचे खेळ हे कसे करतात ते आता मला चांगलच कळलं आहे. अमित शहा यांच्याशी माझं बोलणं झालं होत, तरी माझ्या पक्षावर खोटारडेपणाचे आरोप केले जात आहेत. मी हे खपवून घेणार नाही. मला ह्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, खोटारडे कोण आहे, हे तुमच्यासमोर आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा माझ्या पक्षाकडून कधीही अपमान झालेला नाही, नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितले कि उद्धव मला हे माझ्या लहान भावासारखे आहेत, त्यामुळे भावा – भावा च्या या नात्याला हे लोक खोटे ठरवत आहे. सगळ्यांना माहित आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा कधीही खोटं बोलू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com