लखनौ : समाचार ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचार सभांमधून केवळ विरोधकांवर टीका करण्याचेच काम करीत आहेत. मोदी सरकारने केंद्रात पाच वर्ष सरकार चालवले त्यात त्यांनी काय विकासाची काम केली याची माहिती जनतेला देणे अपेक्षित आहे पण त्याची काहींही माहिती न देता ते केवळ विरोधकांवरच टीका करीत सुटले आहेत असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. लोकांना आता चौकीदार नको आहे तर रोजगार हवा आहे असा टोमणाही त्यांनी मोदींना उद्देशून मारला.
ते म्हणाले की लोक आता भाजपच्या खोटारडेपणाच्या राजकारणाला कंटाळले असून ते आता थकले आहेत. त्यांना या राजवटीपासून मुक्तता हवी आहे. लोकांच्या या मुडचा भाजपच्या नेत्यांनाही आता अंदाज आला आहे त्यामुळेच त्यांनी आता जाहीर प्रचार टाळायला सुरूवात केली आहे असा दावाही त्यांनी केला. जाहीर प्रचार सभा टाळण्यासाठी त्यांनी आता उन्हाळ्याची सबब पुढे करायला सुरूवात केली आहे असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.