नवी दिल्ली वृत्तसंस्था : पाकिस्तान भारताविरुद्ध नेहमीच कुरघोडी करत असते. आता देखील पाकिस्तानने भारताविरूद्ध विषारी कट रचला आहे. सतलज नदीमध्ये चामड्याच्या कारखान्यांमधून विषारी रसायने व कचरा टाकून पाकिस्तान आपले पाणी दूषित करीत आहे, ज्यामुळे पंजाबच्या सीमा रेषेवरील गावांमध्ये लोक आजारी पडत आहेत, शेतीचेही नुकसान होत असून गुरेही मरण पावले आहेत. भारतावरून पाकिस्तानच्या दिशेने जाताना पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यात सतलज नदीचे पाणी दूषित केले जात आहे. पुरामुळे सतलजचे पाणी भारत आणि पंजाबमधील काही भागातून पाकिस्तानात जाऊन पुन्हा पंजाब व भारतात प्रवेश करते. पण सतलजचे पाणी पाकिस्तानमध्ये प्रवेश करताच चामड्याच्या कारखान्यांचे पाणी सतलजच्या पाण्यात मिसळण्यास सुरवात होते. जेणेकरुन पंजाबमधील खेड्यांतील लोकांच्या पिकांचे नुकसान तसेच जीवित व संपत्तीचे नुकसान होईल. गावकऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी पाणी येते आणि त्यांच्या पिकांचे नुकसान होते, परंतु या वेळी पाण्यात आणखी काहीतरी विषारी व दुर्गंधी पसरली आहे, ही पाकिस्तानची कारस्थान आहे. ज्यामुळे सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मनुष्यांना श्वास घेणे आणि पाणी पिणे अवघड आहे.
रेतेवाली भैणी गावात राहणारे गुरदीप सिंग, रांझा सिंग, देस सिंग आणि सतनाम सिंह हे इथली परिस्थिती सांगताना म्हणतात की, दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो आणि त्यांची पिके वर्षानुवर्षे वाया गेली आहेत. परंतु यावेळी, सतलजमध्ये पुराच्या पाण्या आडून विषारी पाणी सोडण्यात येत आहे, कारण ही नदी भारतातून पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यात आणि नंतर भारतात परत येते.
फाजिल्का जिल्ह्याचे डीएम सुभाष खटक या संदर्भात बोलताना म्हणाले की भाखरा धरणातून सोडले जाणारे पाणी हुसेनीवाला येथून जाते आणि पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातून फाजिल्ल्यातील जलालाबादमध्ये प्रवेश करते आणि नंतर भारतात प्रवेश करते, आणि नंतर पाकिस्तानात जाऊन फाजिल्का सीमावर्ती गावात मुहर जमशेरमध्ये प्रवेश केला. ते म्हणाले की, फिरोजपूरच्या उपायुक्तांनीही पाण्यात विषारी घटक असल्याची माहिती दिली आहे आणि आता फाजिल्काच्या सीमावर्ती खेड्यांमध्येही विषारी पाण्याचे प्रकरण समोर आले असून प्रशासनाने त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत जेणेकरुन या विषारी पाण्याने मनुष्य तसेच गुराढोरांवर याचा परिणाम होणार नाही.