नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईक , नोटाबंदी, जीएसटी आणि राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पत्रकार परिषदेत घेत जोरदार निशाणा साधला आहे . पुलवामानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत राहुल म्हणाले कि सर्जिकल स्ट्राईक हे भारतीय सैनिकांनी केलं होते ना कि मोदींनी त्यामुळे नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचे सांगतात पण हा भारतीय लष्कराचा अपमान असल्याचेही ते बोलले.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. मोदी सरकारने वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिले होते पण ते त्यांना पाळता आलेले नाही. मुळात ते खोटे आश्वासन होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणांना रोजगार देणे हा आमचा मुख्य मुद्दा आहे. मोदी सरकारनं केलेली नोटाबंदीची योजना फसली असून त्याला काँग्रेसची न्याय योजना उत्तर देणार आहे. न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. मोदी सरकारला काँग्रेसने उद्ध्वस्त केले असून आज तुमच्यापुढे जे दिसतेय, तो केवळ पोकळ सांगाडा आहे. येत्या २३ मे नंतर तोही कोसळणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.