अकोला बहुजननामा ऑनलाईन – नोटबंदीच्या काळात एक उत्तम उपक्रम राबविल्याने मोदींनी स्तूती केलेल्या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. त्याचा मोबदला म्हणून मिळालेली रक्कम कमी आहे. ती वाढवून देण्यात आली नसल्याने सोमवारी त्यांनी व इतर काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकीरी कार्यालयासमोर पिऊन विष आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
नीळंकठराव काशीराव देशमुख (पैलपाडा), अर्चना भारत टकले (कान्हेरी गवळी), आशीष मदन हिवरकर (कान्हेरी गवळी), मुरलीधर प्रल्हाद राऊत (शेळद), मोहम्मद अफजल गुलामनबी रंगारी, साजिद इकबाल शेख महेमूद सर्व रा. बाळापूर इत्यादी सहा शेतकऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुरलीधर राऊत या शेतकऱ्याची नोटबंदीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली होती.
का केली होते कौतुक ?
नोटबंदीच्या काळात रोख रक्कम आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाशांकडे पैसे नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी अकोला बाळापूर येथील रस्त्यावर असलेल्या मराठा नावाच्या हॉटेलमध्ये प्रवाशांना मोफत जेवण देऊ केले होते. मुरलीधर राऊत यांचे ते हॉटेल होते. त्यावेळी शेतकरी असलेल्या मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी ही व्यवस्था केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मन की बात या कार्यक्रमात जाहीर कौतुक केले होते. त्यांचे हॉटेल याच राष्ट्रीय महामार्गावर आहे.
हॉटेलच्या जमीनीचा मोबदला वाढवून न दिल्याने केले विष प्राशन
मुरलीधर राऊत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली. संपादित केलेल्या जमीनीचा अत्यंत अल्प मोबदला त्यांना मिळाला. त्यानंतर या जमीनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी राऊत यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर याच मागणीसाठी इतरही शेतकरी दाद मागत आहेत. मात्र जमीनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याने सरकारी अनास्थेमुळे पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यासह आणखी ६ शेतकऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.