नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने आयसीसी अंडर -१९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या संघर्षाबाबत निर्णय दिला असून आयसीसीने पाच खेळाडूंना फटकारले आहे. यात तीन बांगलादेशी आणि दोन भारतीय खेळाडू आहेत. त्यांना आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल ३ चे उल्लंघन केल्याबद्दल पाचही खेळाडूंना फटकारले असून त्यांच्या खात्यात डिमेरिट गुणही जोडले आहेत. बांगलादेशचे मोहम्मद तौहीद ह्रादॉय, शमीम हुसेन व रकीबुल हसन आणि भारतकडून आकाश सिंग व रवी बिश्नोई हे आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन करताना आढळले आहेत.
भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोई याच्यावरही कलम २.५ चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तर रविवारी बांगलादेशने भारताला तीन विकेट्सने पराभूत करत प्रथमच आयसीसी अंडर -१९ विश्वचषक जिंकला असताना सामन्यानंतर बांगलादेश आणि भारतीय खेळाडूंमध्ये संघर्ष झाला. तसेच त्यांच्यात धक्का-बुक्कीही झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंकडूनही यावर टीका केली गेली. भारतीय संघाचा कर्णधार प्रियांम गर्ग यांनी या घटनेस कुरूप म्हटले असून बांगलादेशी कर्णधार अकबर अलीनेही संघाच्या वतीने माफी मागितली आहे.
आयसीसीचे जनरल मॅनेजर ज्यॉफ एलार्डाइस यांनी ‘सामना कठोर होता. आयसीसी अंडर -१९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याकडून तुम्हाला अपेक्षा असेल पण काही खेळाडूंनी अशी कृती केली ज्याची या खेळात जागा नाही. खेळाडूंनी स्वतःला शिस्तबद्ध ठेवले पाहिजे. विजयी संघाचे अभिनंदन करा आणि आपल्या संघासह विजयाचा आनंद घ्या,’ असे त्यांनी एका अधिकारीक निवेदनात म्हटले आहे.
Shameful end to a wonderful game of cricket. #U19CWCFinal pic.twitter.com/b9fQcmpqbJ
— Sameer Allana (@HitmanCricket) February 9, 2020
बांगलादेशच्या मोहम्मद तौहीदला १० निलंबन गुण आणि शमीम हुसेन याला ८ निलंबन गुण देण्यात आले आहेत. ते गुण ६ डिमरेट गुणांच्या बरोबरीचे असून दोन वर्षे त्यांच्या खात्यात राहणार आहेत. तर रकीबुल हसन याला ४ निलंबन गुण देण्यात आले असून ते ५ डिमेरीट गुणांच्या बरोबर आहेत आणि हे दोन वर्ष कायम राहतील.
तसेच भारताच्या आकाशसिंगला ८ निलंबन गुण देण्यात आले आहेत. ते ६ डिमेरीट गुणांच्या बरोबर असून हेदेखील दोन वर्ष त्याच्या खात्यात राहणार आहेत. तर रवी बिश्नोई यांना ५ निलंबन गुण देण्यात आले आहेत.