नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा कहर जोरात सुरू असून मागील 25 दिवसात या व्हायरसने संक्रमितांचा आकडा 15 लाखांनी वाढून दुप्पट म्हणजे तीस लाखांपेक्षा जास्त झाला आहे. या दरम्यान, दिलासादायक बाब ही होती की, मृतांची संख्या या तुलनेत वाढली नाही आणि मृत्युदर कमी होण्यासोबतच रूग्ण बरे होण्याच्या रिकव्हरी दरात उल्लेखनीय सुधारणा झाली.
आरोग्य मंत्रालयाच्या 29 जुलैच्या आकड्यानुसार, देशात 15 लाख 31 हजार 669 लोक कोरोनाने संक्रमित आणि 34,193 लोकांचा मृत्यू झाला होता. 9 लाख 88 हजार 29 संक्रमित बरे सुद्धा झाले होते आणि 5 लाख 9 हजार प्रकरणे म्हणजेच 33.26 टक्के सक्रिय प्रकरणे आणि रिकव्हरी दर 64.50 टक्के होता. मृत्युदर 2.23 टक्के होता.
रविवारी जारी आकड्यांनुसार जगात भारत 30 लाखांपेक्षा जास्त संक्रमित असणारा तिसरा देश आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका आणि दुसर्या स्थानावर ब्राझील आहे.
अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक 56,67,112 लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत तर 1,76,353 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 35,82,362 लाख लोकांना संसर्ग झाला आहे आणि 1,14,250 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आज जारी आकड्यांनुसार, संक्रमणाच्या 69,239 नव्या प्रकरणांसह संक्रमितांचा एकुण आकडा 30,44,940 झाला. याच दरम्यान, 57989 रूग्ण बरे झाले, ज्यामुळे बरे होणार्या एकुण रूग्णांची संख्या 22,80,566 झाली आहे. सोबतच रूग्ण बरे होण्याचा दर वाढून 74.89 टक्क्यांवर पोहचला आहे. एकुण संक्रमितांची संख्या 7,07,668 झाली आहे. देशात सक्रिय प्रकरणे 23.43 टक्के आहेत, तर मृतांचा दर 1.87 टक्के आहे.