नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये मागील काही कालावधीपासून राजधानीच्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातून जमीन घोटाळ्याचे एक असे प्रकरण समोर आले आहे, जे धक्कादायक आहे. 797 पांढरे रेशन कार्ड असणार्यांनी सुमारे 200 करोड रूपयांची 700 एकर जमीन खरेदी केली आहे. याचा खुलासा स्वत: सीआयडीने केला आहे. आंध्र प्रदेशमधील या खळबळजनक जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्यातील सीआयडीने सुमारे 797 लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुमारे 200 करोड रुपयांची 700 एकर जमीन असणार्या प्लॉटच्या मालकांचे मासिक उत्पन्न 5 हजार रूपयांपेक्षा कमी असल्याचे सीआयडीच्या तपासात आढळले आहे. याशिवाय, यापैकी बहुतांश लोकांकडे पॅनकार्ड सुद्धा नाही. अमरावतीमध्ये 2014-2015 दरम्यान ही जमीन खरेदी केली गेली होती. वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजे सीआयडीने 2014 आणि 2015 दरम्यान अमरावती राजधानी मतदार संघातील 5 मंडळात अवैध पद्धतीने जमीन खरेदी-विक्रि प्रकरणात टीडीपीचे माजी मंत्री पृथ्वीपती पुल राव, पी नारायण आणि 797 पेक्षा जास्त अन्य लोकांविरूद्ध केस दाखल केली आहे.
सीआयडीचे एडीजी सुनील कुमार यांनी म्हटले की, 797 सफेद रेशन कार्ड धारकांनी 200 करोड रूपयांपेक्षा जास्त रक्कमेची 700 एकर जमीन खरेदी केली. या सर्व सफेद रेशन कार्ड धारकांनी आपले मासिक उत्पन्न 5000 रूपये घोषित केले आहे, यामुळे हे प्रकरण निश्चित संशयास्पद आहे. यांचे व्यवहारसुद्धा संशयास्पद आहेत. यापैकी सुमारे 500 लोकांकडे पॅनकार्डसुद्धा नाही.
Visit : bahujannama.com