बहुजननामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाच रात्रीत आपले करियर बनवणारे किंवा प्रकाशझोतात येणारे अनेक लोक आपण पाहिले असतील. असेही अनेक जण आहेत की त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका रात्रीत त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. असेच काहीसे पश्चिम बंगालच्या राणूच्या बाबतीत घडले आहे. आपल्या सुंदर आवाजात लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन चर्चेत आलेल्या रानूला आता अनेक नामांकित शोच्या ऑफर्स येत आहेत. व तिच्यामध्ये आता आश्चर्यकारक परिवर्तन झाले आहे. तुम्ही तिचा पूर्वीचा आणि आत्ताच फोटो जर पहिला तर तिला ओळखूही शकणार नाहीत.
रिपोर्ट्सनुसार, राणूचा लेटेस्ट मेकओवर शोचे अधिकारी प्रायोजित करत आहेत. रानूला मुंबईत रिअॅलिटी शोसाठीही बोलविण्यात आले आहे आणि ते राणूचा प्रवास खर्चही उचलणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुरेसे आयडी कागदपत्रे नसल्याने राणूला अडचणी येत आहेत. राणूचा हा मेकओव्हर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मेकओवरनंतर ती सुंदर दिसत आहे. राणूने बबलू मंडलसोबत लग्न केले पण त्याच्या निधनानंतर ती पश्चिम बंगालमधील रानाघाटमध्ये परतली. दररोज येथे येणाऱ्या प्रवाश्यांसाठी गाणी गाऊन ती आपली उपजीविका भागवत असे.
आपल्या उत्कृष्ट आवाजातून अनेक कठीण गाणी गाण्यातही राणू यशस्वी झाली आहे. तिने कोणतेही प्रशिक्षण न घेता लता मंगेशकर यांचे गाणे गायले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. राणूच्या व्हिडिओला सुमारे २५ दशलक्ष लाईक्स असून ४८ हजार लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ ४६.६ हजार वेळा पहिला गेला आहे.