बहुजननामा ऑनलाईन टीम : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यापल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तात्काळ निधी वितरीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यानंतर राज्यपालांनी त्यांची मागणी तात्काळ मान्य केली. देवेंद्र फणडणवीस यांनी स्वत: याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. आज राजभवनात त्यांनी राज्यपालांची भेट घेतेल्याचे सांगितले.
मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे. pic.twitter.com/lM8TVFHSmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019
ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे.”
Visit : bahujannama.com