मुंबई : बहुजनामा ऑनलाईन – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील ‘वंचित बहुजन आघाडी’ सोबत आगामी लोकसभेच्या जागा वाटपावरून बिनसल्याने आता काँग्रेसने नवीन फार्मुला अमलात आणण्यासाठी सपा-बसपाला महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
उत्तर प्रदेश मध्ये सपा- बसपा आघाडी झाली असली तरी काँग्रेस सोबत आघाडीचे संकेत असले तरी ते अद्याप झाले नाहीत. मात्र, महाराष्ट्र्रामध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत जागावाटपावरून बिनसल्यामुळे काँग्रेस आता सपा- बसपाला महाआघाडीसोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे.जर सपा-बसपा महाआघाडी सोबत आल्यास बसपाला २ तर सपाला १ जागा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात सपा-बसपा आमच्यासोबत येईल असे आम्हाला वाटतेय. सेक्युलर मतांमध्ये विभागणी होऊ नये.यासाठी सपा-बसपाला महाराष्ट्रात काही जागा सोडण्यात येतील.असेही निरुपम यावेळी म्हणाले.