बहुजननामा ऑनलाईन टीम – ब्राह्मण फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण देणे राष्ट्रवादी काँग्रेस यांना शक्य झालं नाही. असे मत माथाडी कामगार नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. बीडमधील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान नरेंद्र पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना सातारा लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं होतं. परंतु, खासदार उदयनराजे भोसले यांचा त्यांना पराभव करता आला नाही आणि आता विधानसभेचे वारे चांगलेच वाहू लागल्याने सर्व पक्षांची विधानसभेच्या निवडणुकीची तयारी अगदी जोरदार सुरु आहे. त्यातच नरेंद्र पाटील हे ही विधानसभेसाठी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ६ हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना ३५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलं आहे. या कर्जाची परतफेडही चांगली झाली आहे. तसेच लाभार्थ्यांनी जर वेळेत कर्जफेड केल्यास बँकांचा त्यांच्यावरील विश्वासही वाढेल आणि त्यांना अजून जास्तीचे कर्ज मिळू शकेल. असा विश्वास माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.