बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पक्षापक्षांत यात्रेचे वारे फिरत आहेत. यानिमित्तानेच शिवसेनेची जन आर्शीवाद यात्रा औरंगाबादेत पोहचली. याप्रसंगी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी किती दिवस बाहेर राहता आमच्यात येऊन जा अशी खुली ऑफर विनोद पाटील यांना दिली. अशी माहिती सुत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबदेतील यात्रेत ठाकरे ताठे मंगल कार्यालयात नागरिकांशी संवाद साधणार होते. मात्र नागरिकांशी संवाद साधायच्या आधी त्यांनी विनोद पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी विनोद पाटील यांनी यशस्वीपणे न्यायालयीन लढाई लढली आहे. नागरिकांशी संवाद साधण्याआधी ते विनोद पाटील यांच्या घरी गेले. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकात खैरे, आमदार आंबादास दानवे सोबत होते. तर विनोद पाटील यांच्या सोबत अभिजीत देशमुख होते. यावेळी ठाकरे यांनी सुरवातीला सर्वांसमोर पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर इतर सहकाऱ्यांना बाहेर जायला सांगून बंद दाराआड पाटील यांच्याशी साधारण अर्धा तास चर्चा केली.
विधानसभा निवडणुकांमुळे ठाकरे-पाटील यांच्या भेटीला राजकीय महत्व असल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या ऑफर वर एकदम निर्णय घेता येणार नाही, विचार करुन सांगतो असे पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्यानंतर त्याच्यात मोफत शिक्षणाबद्दल चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.