पुणे बहुजननामा ऑनलाईन – भाजप-शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर पक्षातील आमदार सोडून गेले तर त्याचा परिणाम होणार नाही. मी यापुर्वी सहाचे साठ आमदार करून दाखवले आहेत. पक्ष कसा उभारायचा हे मला ठाऊक आहे. अशा आत्मविश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
माझ्या पक्षाचे साठ आमदार १९८० च्या निवडणूकीत निवडून आलेले होते. त्यावेळी मी १५ दिवसांसाठी परदेशात गेलो होतो. तेव्हा सत्तेचे अमिष दाखवून काही मंडळींनी त्यांना फोडले. परंतु मी परतलो तेव्हा माझ्याबरोबर फक्त ६ आमदार राहिले होते. त्यानंतर मात्र १९८५ च्या निवडणूकीत पुन्हा मी ६ चे ६० आमदार करून दाखवले होते. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून गेल्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. आमदार बाहेर पडत आहेत.
परंतु तरुणही तेवढ्याच प्रमाणात पक्षासाठी उत्साहाने पुढे येत आहेत. त्या निमित्ताने तरुणांना अधिक संधी देता येईल. असे शरद पवार म्हणाले. पक्षातील सर्वांनाच मी आपलं मानतो. जे गेले ते माझ्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलून गेले आहेत. परंतु कोणाच्याही जाण्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला फरक पडणार नाही.