बहुजननामा ऑनलाईन – पश्चिम बंगालचा निकाल जाहीर झाला. निकालावरून राज्यातच नाहीतर देशात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. तर समाज माध्यमावर एक मेसेज प्रसारित होताना दिसत आहे की, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पावसात भिजले तेव्हा आणि बंगालमध्ये ममतादीदीच्या खुर्चीवरून प्रचार करण्यामुळे कमळ कोमेजले. परंतु हे एक कारण झालं. सत्ता बदलण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. कोणाची सत्ता आली, कोणाची गेलीय परंतु, बंगालच्या कालच्या निकालानंतर कोणाची प्रतिभा संपली. असे म्हणता येणार नाही कारण, भारतात कुठल्याही एकाची प्रतिभा असू शकत नाही. तेव्हा कोणी त्यामधून संपण्याचा सवालच समोर येत नाही.
यावरून कोणाची मक्तेदारीचं रूप येऊ शकत नाही. हे राजकारणीय स्थिती आहे. सर्व देशाचा विचार करता भारतातच श्रीमंत लोकशाही चालते. देशात अनेक भाषा, रूढी, परंपरा हि विविधता लोकशाही जपते आहे. जसे की उत्तरप्रदेश राज्यात उगवते तसे पश्चिम बंगालमध्ये पेरले जाऊ शकत नाही. यावरून एकच फुल सर्व ठिकाणी फुलू शकणार नाही. असे बंगालच्या कालच्या निकालावरून स्पष्ट केलं आहे. तसेच, भारताला घटनाकारांनी विचारपूर्वक संघराज्य पद्धती सुपूर्द केलीय. त्यामध्ये केंद्रात सर्व अधिकार बहाल करताना राज्याचे देखील कुतूहल जपले गेले आहे.
देशात केंद्राच्या सूचीप्रमाणे सामायिक आणि स्वतंत्र राज्य सूचीत राज्याचे विषय, अधिकार अबाधित आहेत. यावरून केंद्र आणि राज्य लगत कायदे, घटनाक्रम यामुळे भारत हा एकसंघ लोकशाही आहे. तर केंद्राने राज्यावर कोणतेही अतिक्रमण न करता राज्याला स्वतः स्वातंत्र्य असणे आणि, राज्यांनी स्वतःचे अस्तित्व जपताना स्वायत्त होण्याची भूमिका घेऊ नये, हे अपेक्षित आहे. मात्र सध्या राजकारणावरून केंद्र आणि राज्य असा संघर्ष होताना दिसतोय. बंगालमध्येही ममतां बॅनर्जी यांनी असच केले होते. केंद्र आणि राज्य यावरून CBI प्रकरण, पोलीस यंत्रणा, अशावरून अनेक कुरघोडी निर्माण झाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारच्या खेळी दिसल्या. तर बंगालमध्ये ज्या पद्धतीने मेजॉरिटी घेऊन ममता आल्या यामध्ये काय सिद्ध होते? तर तेथील त्यांचे प्रभावी नेतृत्व, राज्यातील, देशातील राजकीय समतोल असतो. यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही गोष्टी निराळ्या आहेत. आज विजय असतो उद्या निकाल वेगळा असतो. परंतु तेथे आव्हान असते हे नक्की. तर साथ देणारी असते ती म्हणजे राज्यातील प्रादेशिक पक्ष .
दरम्यान, ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा बंगालचा गड राखला, मात्र येथे भारतीय जनता पार्टीच्या जागा मात्र प्रचंड वाढल्या यावरून आता महाराष्ट्र राज्यात काही अदलाबद्दल होईल का? अशी चर्चा आता काही कालावधीत थांबेल, अर्थात त्या चर्चेला काही अर्थ नव्हता. राष्ट्रवादी-शिवसेनेने गाठ बांधणे, त्यात काँग्रेसने सत्तेत सहभागी होणे हे समांतर रेषा एकत्र येण्यासारखे आहे. ज्या तीव्रतेने ३ पक्ष सामायिक झाले आहे. त्यापाठीमागची जी कोणती ऊर्जा आहे, ती सहज विस्कटणारी नाही. महाविकास आघाडी मधील ३ पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना सत्ता सोडून लांब जाणे परवडणे भाग होणार नाही. कोणतेही संकट आले तरी सावरत अखेर राजकारणामध्ये काहीही होऊ शकते हे ग्राह्य धोरणेच उचित असते.