मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब करतो असे शरद पवार यांनी सांगितले. ईडीच्या बॅकफूटनंतर शरद पवार यांनी सांगितले की मी जबाबदार माणूस आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. कारण मी महाराष्ट्रतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न पाहिला आहे. परंतू सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाऊन शकते.
शरद पवार म्हणाले, या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. माझ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित व्हावा हे मला पटत नाही, त्यामुळे मी ईडीच्या कार्यालयात जाणार नाही. या पुढे शरद पवार बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात जनतेमध्ये संतापाची लाट आहे, मुंबईसह राज्यातील अनेक भागात लोक संतप्त आहे. त्यामुळे या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. महाराष्ट्राच्या जनतेची आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. राहूल गांधी, महमोहन सिंग यांनी देखील दिलेल्या पाठिंब्या बद्दल मी आभारी आहे. यानंतर शरद पवार पुण्यात पूरामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी जाणार आहेत.
ईडीने पाठवले होते पत्र
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सक्तवसुली संचलनालयात जाण्याचा चंग बांधून बसले होते. मात्र खुद्द ईडीलाच बॅकफूटवर यावे लागले होते, ईडीने शरद पवारांना मेल करुन तूर्तास चौकशीची गरज नाही असे सांगितले होते. शिखर बँकेत गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार होते. दुपारी 1 वाजता शरद पवार ईडीची कार्यालयात हजर राहणार होते, तसा मेल शरद पवार यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून ईडीच्या कार्यालयाला कळवले होते.
Visit : Bahujannama.com