मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची पोलीस आयुक्त पदावरून केलेली बदली. त्यानंतर सिंग यांनी गृहमंत्र्यावर केलेले खंडणीचे आरोप या प्रकरणामुळे मुंबई पोलीस कधी नव्हे एवढे बदनाम झाल्याचे दिसत आहे. तर परमबीर सिंग यांच्यावरही एका पोलिस अधिकाऱ्याने करिअर उद्धवस्त केल्याचे आणि ५० लाख ते दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचे गंभीर आरोप केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. तर अशातच एक पोलीस अधिकारी असे आहेत की, जे दिवाळी आली की त्यांच्या कार्यालयाबाहेर बोर्ड लावून दिवाळी गिफ्ट आणणाऱ्यांना दाराबाहेरूनच परत पाठवतात.
तसेच, व्ही व्ही लक्ष्मी नारायण हे पोलीस अधिकारी ज्यांनी हजारो कोटींचा सत्यम घोटाळा उघडकीस आणला. तेव्हा नारायण हे CBI मध्ये होते. त्यानंतर ते महाराष्ट्र केरळमध्ये परत आले. त्यांच्या कालावधीत एक किस्सा खूप प्रसिद्ध झाला आहे. तो म्हणजे, आपल्याकडे दिवाळी गिफ्ट जे दिले जाते, त्यावरूनच खासगी कंपन्यांचे अधिकारी ते सरकारी अधिकारी सर्वांनाच त्यांच्याशी दररोज ज्यांचे संबंध येतात असे लोक दिवाळी आली की अनेक वेगवेगळ्या महागडे गिफ्ट देत असतात. परंतु, ही एक प्रकारची त्यांची मर्जी रहावी म्हणून लाचच असते. तर व्ही व्ही लक्ष्मीनारायण दिवाळी आली की त्यांच्या कार्यालयाबाहेर एक बोर्ड लावायचे, असे म्हटले जाते. तर तो बोर्ड म्हणजे आमच्याकडे दिवाळी गिफ्ट स्वीकारले जात नाही, असा तो बोर्ड होता. तर लक्ष्मी नारायण यांनी काही वर्षांपूर्वी व्हीआरआएस घेतली.
परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणीवरून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आरोप केला होता. ही अशी गोष्ट होती जी तेव्हा ऑफलाईन होती परंतू परमबीर सिंग यांची बदली झाल्याने ती उघडकीस आली. यावरून राज्यात आणि आता लोकसभेत ही याचे वातावरण तापले आहे. यामुळे मुंबई पोलिसांची पुरती बदनामी झालेली आहे. पोलीस आयुक्तांनीच आणखी एक पोलीस अधिकारी ACP संजय पाटील यांच्याशी झालेले मेसेज चॅटिंग जाहीर केली आहे. परंतु, या पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहेत, जे एक मिसाल बनले आहेत.
दरम्यान, नावा प्रमाणे समाजाची सेवा असे आहे, मात्र मूळ उद्देश हा मुंबईतील डान्स बार, रेस्टॉरंट, हॉटेलवर छापे टाकून अवैध धंदे आणि त्यामध्ये अडकलेल्यांना सोडविणे हे आहे. ही मुंबई पोलिसांचीच एक शाखा आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाराखाली ही शाखा येते. काही वर्षांपूर्वी ही शाखा क्राईम ब्रांचपासून वेगळी करण्यात आली होती. आणि ती पोलीस आयुक्तालयाला जोडली गेली, तसेच, जेव्हा डॉ. सत्यपाल सिंह मुंबई पोलिस आयुक्त झाले तेव्हा त्यांनी पुन्हा ती शाखा मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग केली. तर परमबीर यांनी याच शाखेचा १०० कोटींच्या वसुलीशी संबंध जोडत जोरदार आरोप केला आहे.