नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमध्ये सतत नोकरीसाठी अर्ज घेण्यात येत आहेत. या पदांसाठी लाखो उमेदवारही अर्ज करीत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये करियर बनवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये एकूण ४,१०३ पदे असणार आहेत. जर तुम्हाला ही नोकरी मिळवायची असेल तर आजच अर्ज करा. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अर्ज करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत.
पदाचे नावः अपरेंटिस
पदांची संख्या: ४, १०३
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सादर करण्याची प्रारंभ तारीख: ९ नोव्हेंबर, २०१९.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखः ८ डिसेंबर २०१९ (दुपारी २३:३० पर्यंत)
वय मर्यादा:
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे निश्चित केले गेले आहे.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया:
गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज फी:
अनुसूचित जाती / जमाती / महिला / पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. इतर सर्व उमेदवारांना १०० रुपये फी भरावी लागेल.
अर्ज प्रक्रिया:
दिलेल्या कालावधीत पूर्ण केलेला अर्ज वैध असेल. अर्ज करण्यापूर्वी, कृपया दिलेली सूचना वाचा. सर्व माहितीची जाणीव झाल्यानंतर, ०८ डिसेंबर २०१९ पर्यंत (रात्री ११:३० पर्यंत) अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.
Visit : bahujannama.com