बहुजननामा ऑनलाइन टीम : हैदराबाद सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या करण्यात आलेल्या एन्काऊंटरवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दर्शिवली. कोणी याचे स्वागत केले तर कोणी याचा राग व्यक्त केला. या प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मोठे विधान केले आहे. हैदराबाद एन्काऊंटरमधील ठार करण्यात आलेल्या घटनेवर सरन्यायधीश शरद बोबडे यांनी देखील टीका केली आहे.
जोधपुरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात न्यायमुर्ती एस.ए बोबडे म्हणाले, न्याय कधीही प्रतिशोधाच्या भावनेनं करु नये, जर न्याय प्रतिशोधाच्या भावनेने केल्याचा त्याचा अर्थ राहणार नाही. कोणताही न्याय घाईघाईत करु नये. जर न्याय हा प्रतिशोधाच्या भावनेने केला गेल्यास त्याचा गाभा नाहीसा होईल. यावेळी कायदामंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित होते.
CJI SA Bobde in Jodhpur: Recent events in country have sparked off the old debate with new vigour. There is no doubt that criminal justice system must reconsider its position & attitude towards laxity and eventual time it takes to dispose off criminal matters.. (File pic) (1/2) pic.twitter.com/Iwex3sdaXX
— ANI (@ANI) December 7, 2019
हैदराबाद बलात्कार पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मार्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार ४ जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून तिच्यावर अत्याचार करण्याता आला होता. तिला बुधवारी 9.30 वाजल्यापासून ते गुरुवारी 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार केले. त्याचबरोबर तिच्यावर बलात्कार करुन तिला जाळण्यात देखील आले होते. या प्रकरणी चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री 9.15 वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.
Visit : bahujannama.com