पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – रुपी बँकेतील (Rupee Bank) ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी (दि.9) लोकसभेत दिल्याची माहिती पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांना दिली. रुपी बँकेतील (Rupee Bank) ठेवीदारांच्या पैशांबाबत गिरीश बापट यांनी लक्ष वेधले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लोकसभेतील चर्चेपूर्वी आपण सीतारामन यांची आज सकाळी भेट घेऊन याच विषयावर चर्चा केली होती. बापट म्हणाले, पीएमसी (PMC) व गुरु राघवेंद्र बँकेसारख्या (Guru Raghavendra Bank) लहान बँकांतील ठेवीदारांनाही पैसे परत मिळतील, असेही अर्थमंत्र्यांनी लोकसभेत स्पष्ट केलं.
डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्ट (DICGC Act) हे विधायक आज लोकसभेत मंजूर झाले. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी रुपी बँके सारख्या लहान बँकातील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचे पैसे 90 दिवसांत परत मिळतील, असे आश्वासन दिले.
विलीनीकरणाबाबतचा निर्णय लवकरच
बाटप यांनी सांगीतले की, अर्थमंत्र्यांची मी सोमवारी सकाळी भेट घेतली.
त्यावेळी विलीनीकरणाचा (Merger) मुद्दाही त्याच्याकडे मांडला.
त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी येत्या दोन ते तीन दिवसात चर्चा करुन विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करु असे आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचे बापट यांनी सांगितले.
तसेच मागील 8 वर्षापासून रुपी बँक विलीनिकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे.
त्यामुळे बँकेच्या अनेक ठेवीदारांच्या (Depositors) समोर आर्थिक अडचण उभी राहीली आहे.
याबाबत अर्थ मंत्रालयाने व रिझर्व्ह बँकेने (RBI) धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सीतारामन यांच्याकडे केल्याचे बापट यांनी सांगितले.
RBI ने पुन्हा बँकिंग परवाना द्यावा
बँकेच्या प्रशासकीय मंडळाने विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठवला असून त्याला आपण मंजुरी द्यावी, अशीही विनंती बापट यांनी केली आहे.
मागील आठ वर्षात या बँकेने 300 कोटी रुपयांचे कर्ज वसूल केले असून सुमारे 1300 कोटी रुपयांच्या ठेवी रुपी बँकेकडे आहेत.
लघु वित्तीय बँकेत (Microfinance Bank) रुपांतर करण्यासही आमची हकत नाही.
ते शक्य नसेल तर रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेला पुन्हा बँकिंग परवाना द्यावा,
अशी मागणी केल्याचे बापट यांनी सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्रात विलीनीकरण करणे योग्य
रुपी बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये विलीनीकरण करणे योग्य ठरेल.
त्याचा बँक ऑफ महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
उलट बँक ऑफ महाराष्ट्रचा व्यावसायिक लाभ होईल, असा दावा बापट यांनी सीतारामन यांच्याकडे केला. तसेच दोन्ही बँकांची मध्यवर्ती कार्यालये पुण्यातच आहेत.
त्याचा ग्राहक आणि कार्यपद्धतीवर परस्परांना पूरक असल्याने आपण रुपी बँकेचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती सीतारामन यांच्याकडे केल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.
Web Title : rupee bank pune depositors will get money soon says nirmala sitharaman
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 123 नवीन रुग्ण, 142 जणांना डिस्चार्ज