बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन – सतत पडणारा दुष्काळ हा जाणतेसमोरचा भयावह प्रश्न आहे. यावर उपाय योजना म्हणून वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ झाली पाहिजे. अशी अपेक्षा पहिल्या पाणी परिषदेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे राज्यातील पहिली पाणी परिषद मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेला खासदार प्रताप जाधव. जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर. प्रविण खंडेलवाल. श्याम पठाडे. भास्कर कदम. ज्ञानेश्वर डहाके, डॉ. सुकेश झंवर माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे. नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी. जलदूत डॉ. सतीश चव्हाण. जलसल्लागार माधव कोटस्थाने. नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके आदी उपस्थित होते.
नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले. की गोसेखुर्दमधून वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यापैकी १०० टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त ६ जिल्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यालाही या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास २५ टिएमसी पाणी मिळेल. खासदार प्रताप जाधव यांनी विकास निधीतून ५ लाख रुपये देऊन या ४७ किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी किंवा कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प गरजेचे असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राच्या माध्यमातून केली. जल सल्लागार माधव कोटस्थाने यांनी नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना काय फायदे होतील. किंवा हा प्रकल्प आवश्यक आहे का ? शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे. याबाबत सविस्तर माहिती दिली.