बहुजननामा ऑनलाइन टीम : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला लोक रस्त्यावर उतरुन विरोध करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभा, राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या कायद्याच्याविरुद्ध देशभर आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना देखील घडत आहेत. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशात शांतता राखण्याचे आवाहान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रेणुका शहाणे यांनी ट्विट करत म्हणाल्या की, ‘सर आधी सामान्य जनतेला तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हॅंडलपासून दूर राहण्याची विनंती करा. कारण त्यांच्याकडूनच अधिकाधिक अफवा, खोटी माहिती पसरवण्यात येत असल्याने बंधुत्वाला, शांततेला आणि एकतेला धोका निर्माण होत आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे तुकडे गॅंग आहे. भाजपाच्या आयटी सेलला द्वेष पसरवण्यापासून थांबवा.’ असे ट्विट करुन त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
https://twitter.com/renukash/status/1206618988207173632
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सांगितले की, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन हिंसक आंदोलने करणे हे दुर्देवी आणि अत्यंत त्रासदायक आहे. वादविवादस चर्चा आणि मतभेद हे आपल्या लोकशाहीचा एक भाग आहे. पण कधीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन सर्वसामान्यांच्या जीवनात अडथळा निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाही असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एकत्रित भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषितांच्या सक्षमीकरणासाठी काम करणे ही काळाची गरज आहे. आम्ही स्वार्थासाठी स्वारस्य असलेल्या गटांना आमचे विभाजन करण्यास आणि त्रास निर्माण करण्यात थारा देऊ शकत नाही.शांतता, ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा व इतर खोटेपणापासून दूर रहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे केले.
This is the time to maintain peace, unity and brotherhood. It is my appeal to everyone to stay away from any sort of rumour mongering and falsehoods.
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019
I want to unequivocally assure my fellow Indians that CAA does not affect any citizen of India of any religion. No Indian has anything to worry regarding this Act. This Act is only for those who have faced years of persecution outside and have no other place to go except India.
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019
संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आता लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन सुरु आहे.
Visit : bahujannama.com