मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठीचा मसुदा काँग्रेसनं आम्हाला दिल्यास तरच त्यांच्याबरोबर निवडणूक पूर्व किंवा नंतर युतीसाठी वंचित बहूजन आघाडी तयार आहे. संविधान बाह्य संघटनांवर नियंत्रण आणणे हा धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या पक्षांसाठी महत्वाचा मुद्या असला पाहिजे. काँग्रेसप्रणित महाआघाडीत सहभागी सर्वांच यावर एकमत असायला हवे, असे पत्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठविले आहे.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी १२ जागा मागितल्या होत्या. त्यावर चर्चा होऊन त्यांना चार जागा देण्याची तयारी काँग्रेस-राष्ट्रवादीने दर्शविली आहे. मात्र आंबेडकर त्यावर राजी नाहीत.आता केंद्रात सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची हमी द्या अशी युतीसाठी अट त्यांनी काँग्रेसला घातली आहे. त्यांची ही अट मान्य करण्याचे काँग्रेसच नव्हे तर राष्ट्रवादीनेही ठरविले आहे.
काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे एआयएमआयएम हा पक्ष जर रझाकारांशी संबंधित आहे म्हणून आघाडीत नको असे काँग्रेस म्हणते, मग ज्या मुस्लिम लीगचा देशाच्या फाळणीशी संबंध आहे. तो पक्ष केरळमध्ये काँगेसला राजकीय मित्र म्हणून कसा चालतो हा राजकीय विरोधाभास समजला नाही. २०१४ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपा सरकार येण्यासाठी राष्ट्रवादी काँगेसने पूर्णपणे मदत केली तरी त्यांना सेक्युलर समजता याबद्दल आश्चर्य वाटते, अर्थात तो तुमचा प्रश्न असा टोला आंबेडकर यांनी काँगेसला लगावला आहे.