मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रिझर्व्ह बँकेनं सर्वसान्यांसोबत आता मोदी सरकारलादेखील हादरा दिला आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तविला आहे. आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली असून चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीत अजून भर पडली आहे.
सध्या ३.५ टक्के असलेला महागाई दर ३.७ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आरबीआयकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, आर्थिक आघाडीवर संकटात सापडलेल्या मोदी सरकारला आरबीआय रेपो रेट कमी करुन काहीसा दिलासा देण्याची शक्यता होती. मात्र या सर्व अपेक्षांवर पाणी पसरले आहे. सलग पाचवेळा रेपो रेट कमी करणाऱ्या आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवले. त्यामुळे आता रेपो रेट ५.१५ टक्के इतकाच असेल.
याआधी रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. काही दिवसांपूर्वी विकास दराचे आकडे जाहीर झाले. देशाच्या जीडीपीमध्ये मागील तिमाहीत केवळ ४.५ टक्क्यांची वाढ झाली होती. जीडीपी वाढीचा हा गेल्या ६ वर्षांतील निच्चांक आहे. अश्या वेळी आरबीआय रेपो रेट कमी करेल अशी आशा होती. मात्र या सगळ्यांनाच आरबीआयनं जोरदार धक्का दिला.
Visit : bahujannama.com