बहुजननामा ऑनलाइन टीम : ऑनलाइन बँकिंगमधील व्यवहार वन टाइम पासवर्डद्वारे (ओटीपी) पूर्ण होतो. ही प्रक्रिया ऑनलाईन बँकिंग घोटाळ्याला आळा घालण्यासाठी सिद्ध होत नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणखी अनेक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी करत आहे. ऑनलाइन बँकिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रक्रियेमध्ये मोठ्या बदलांची तयारी करीत आहे. यासाठी आरबीआय आणि वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, आत्तापर्यंत ऑनलाईन बँकिंगमधील व्यवहार वन टाईम पासवर्ड (ओटीपी) च्या माध्यमातून पूर्ण होतो. ऑनलाईन बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी ही प्रक्रिया प्रभावी सिद्ध होत नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणखी अनेक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी करत आहे.
आरबीआयच्या प्रस्तावानुसार, आपल्याला व्यवहार पुर्ण करण्यासाठी चेहऱ्याची ओळख, आयरिश आणि आपले लोकेशन यांसारखी माहिती मागितली जाऊ शकते, याचा अर्थ असा की आता बँकिंग करणाऱ्यांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे लोकेशन सांगावे लागेल. बैठकीत अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने रिझर्व्ह बँकेला ऑनलाईन घोटाळे थांबविण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर केंद्रीय बँकेने अशा प्रस्तावावर विचार करण्यास सुरवात केली आहे. ऑनलाइन बँकिंग अंतर्गत, व्यवहार पूर्ण करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2 एफए) चा वापर केला जातो. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 2 एफए नावाचे दोन सुरक्षा स्तर वापरले जातात.
पहिल्या स्तरामध्ये ग्राहकास कार्ड व सीव्हीव्ही क्रमांक इत्यादीचा तपशील घेऊन व्यवहार करण्यास सुरवात केली जाते आणि दुसर्या स्तरावर ओटीपीची माहिती भरायची असते, जी ग्राहकाच्या संबंधित मोबाइल नंबरवर येते. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, देशात डिजिटल बँकिंगमध्ये निरंतर वाढ होत असल्याने ऑनलाइन फसवणूकीचे प्रमाणही वाढत आहे. देशात डिजिटल व्यवहार वार्षिक 13 टक्क्यांनी वाढत आहेत, तर मोबाइल वॉलेट्स 50 टक्क्यांहून अधिक वाढत आहेत. 2019 मध्ये बँकिंग फसवणूकीची रक्कम 71,543 कोटी रुपये होती, तर गेल्या तीन तिमाहीत ऑनलाइन बँकिंग घोटाळ्याची 8,926 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील 18 बँकांचे सुमारे 1.17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.