मुंबई : बहुजनामा ऑनलाइन – एक दुसऱ्याचा द्वेष टाळावा आंबेडकरवाद्यांनी आपसातील मतभेद जाळावा, म्हणून होत आहे हा मेळावा अशी कवितेच्या स्टाईलने सुरवात करत देशभरातील आंबेडकरी बहुजन जनता माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन आरपीआय राष्ट्रीयअध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सोमवार ४ फेब्रुवारी मुंबई येथे बोलताना केले, शिवसेना – भाजपसोबत युती केल्यांनतर रिपाईची ताकद आहे कि नाही, माझ्यासोबत कार्यकर्त्यांची फळी,आहे कि नाही हे बघण्यासाठी आज कामगार स्टेडियमवर प्रचंड संख्येने रिपाईच्या मेळाव्यास जमलेल्या जनसमूहाला बघा, असे ना.रामदास आठवले म्हणाले.
मुंबईत कामगार स्टेडिअमवर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने प्रचंड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक तसेच यशस्वी आयोजन मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी केले, यावेळी राज्याचे महसूल मंत्री ना चंद्रकांतदादा पाटील आणि ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर, राजा सरवदे, चंद्रशेखर कांबळे ,दीपक निकाळजे ,रमेश गायकवाड ,सीमाताई आठवले आदी मान्यवरांसह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी ना. आठवले बोलत होते.
ते म्हणाले, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढविणार आहे ,हा मतदार संघ रिपाईला सोडावा त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे ,भारतीय घटना भाजप बदलणार नाही, मागासवर्गीयांचे आरक्षण कोणीही काढणार नाही, विरोधी पक्ष भाजपवर खोटे आरोप करीत आहेत. असे रामदास आठवले यांनी सांगितले.