नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रामदास आठवले यांनी २ मार्चला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करणार आहेत.हि सभा काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने ही अभिवादन सभा गोल्फ क्लबच्या ईदगाह मैदानावर असल्याचे आयोजकडून सांगण्यात आले.
या अभिवादन सभेला केंद्रीय समाजकल्यान राज्यमंत्री रामदास आठवले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे.माजी पालकमंत्री छगन भुजबळ. पशु संवर्धन मंत्री महादेवराव जानकर. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष या सभेस उपस्थीत राहतील.असे कार्यक्रमाचे निमंत्रकाकडून सांगण्यात आले.
काळाराम मंदिर सत्याग्रह असो की महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा लढा मानवमुक्तीचा लढा होता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान मिळून दिला. येथील अस्पृश्य जर हिंदू आहेत तर त्यांना मंदिर प्रवेश का नाही ? त्यांना समान अधिकार मिळून देण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. पण त्यांच्या हाती निराशा आली. व त्यांनी १९५६ ला हिंदू धर्माचा त्याग करून बुद्धाचा समानतेवर आधारित असलेला धम्म दिला.