बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. याकाळात सोशल मीडियावर लोकांकडून 80च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ पुन्हा दाखवण्याची मागणी केली होती. त्यानुसाार 28 मार्चपासून दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. पण आता सोशल मीडियावर याच मालिकेशी संबंधीत दूरदर्शन वाहिनीला प्रश्न विचारले जात आहेत.
रामनवमीच्या दिवशी प्रत्येक घरात राम जन्माचा उत्साव साजरा केला जात होता तर दुसरीकडे दूरदर्शनवर रामायण मालिकेत दशरथावर अंत्यसंस्कार केले जात होते’ असे ट्वीट चित्रपट व्यापार विश्लेषक अनंत विजयने यांनी केले आहे. ‘डीडी नॅशनल रामायण दाखवण्याच्या बाबतील निष्काळजीपणा करीत आहे. तरी देखील प्रकाश जावडेकर मालिका पाहत आहेत. अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर देखील अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. एका यूजरने काल बालीचा पूर्ण संवाद देखील दाखवला नाही असे म्हटले होते.
रामायण ही मालिका ऑन-एअर येताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले. इतकेच नव्हे तर 2015 पासून आतापर्यंत प्रसारित झालेल्या जनरल एंटरटेनमेंट कॅटगरीच्या मालिकांतही रामायण मालिका सर्वोत्तम ठरत आहे. लॉकडाउनच्या काळात रामायणासोबत 80 आणि 90च्या दशकातील अनेक मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. यामध्ये ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘सर्कस’, ‘फौजी’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकांचा समावेश आहे.