कोल्हापूर बहुजननामा ऑनलाईन – मोदी सरकारमधील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका करत ,गोंधळला अर्थसंकल्प ,जुन्या बाटलीतील नवीन दारू अशी टीका केली आहे.त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. या सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या तरतुदी केल्या नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर अशा तरतुदी करणे गरजेचे होतं .परंतु शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या भरीव तरतुदी न केल्यामुळे राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शेतीविषयक आर्थिक धोरणांमध्ये वृद्धी होण्याऐवजी त्यात घट झाल्यानं शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. पण तसे काहीच या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.दिवसेंदिवस शेतीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत असून त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात भरपूर प्रमाणात तरतुदी करण्याची गरज होती पण सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे.