मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वाढीव वीजबिलासंदर्भात गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली होती. राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर राज्यपालांनी राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. यानंतर आता राज ठाकरे(Raj Thackeray ) आणि शरद पवार यांच्या फोनवर चर्चा झाली आहे अशी माहिती समोर आली आहे.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार यांनी स्वत: माहिती दिली आहे की, त्यांना राज ठाकरेंचा फोन आला होता. मला राज ठाकरेंचा फोन आला. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरेंनी चर्चा केली असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राज ठाकरेंना भेटण्याबाबत अजून काही ठरलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
राज्यपाल भेटीनंतर काय म्हणाले होते राज ठाकरे ?
राज्यपालांना भेटल्यानंतर राज ठाकरे म्हणाले होते, “नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याशी बोलणं झालं आहे. ते लवकरात लवकर निर्णय घेऊ असं म्हणाले आहेत. परंतु अजून तो होत नाही. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी शरद पवारांशी बोलून घ्या असं सांगितलं. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटतं हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. तर मग प्रकरण कशात अडकलं आहे कळत नाही.” अशी टीका त्यांनी केली होती.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. pic.twitter.com/N6zSuYX9ed
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2020
राज ठाकरेंना काय म्हणाले होते राज्यपाल ?
राज्यपाल राज ठाकरेंना म्हणाले होते की, “सरकारमध्ये शरद पवारांचं ऐकलं जातं. त्यामुळं आपणही शरद पवारांशी एकदा बोला. मी सरकारला पत्र पाठवेन, परंतु त्यावर सरकार काही करेल का याबद्दल मला शंका आहे. म्हणून आपण शरद पवार यांच्याशी बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तरीही मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलेन आणि जे काही करता येईल ते निश्चित करेन.”