मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Rain in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यात पावसाने (Rain in Maharashtra) धो-धो केल्यांनतर आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान आगामी साधारण 10 दिवस राज्यात पाऊस दडी मारणार आहे. असं हवामान विभागातील (Indian Meteorological Department) काही तज्ज्ञाकडून सांगण्यात आलं आहे. मागील आठ्वड्यामध्ये काही भागात पावसाने हजेरी लावत अनेक ठिकाणी जोरदार पावसाने वेग घेतला होता. या कालावधीनंतर आता पाऊस गायब होणार असल्याची माहिती हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. या कारणाने महाराष्ट्रातील शेतकरी (Farmers) चिंताजनक झाल्याचे दिसत आहे. दरम्यान पाऊस सप्टेंबर (September) मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये परतणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऑगस्टमध्ये प्रारंभी राज्यात सर्वत्र पावसानं उघडीप घेतली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेर चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली आहे. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी मान्सून पुन्हा दणक्यात आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. तर, आगामी 10 दिवस महाराष्ट्रात (Maharashtra) पाऊस गायब असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या अगोदरच मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं (Mumbai Regional Meteorological Department) आगामी 4 ते 5 दिवस राज्यात कोणताही इशारा दिला नाही. आगामी 5 दिवस राज्यात पावसाची उघडीप असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. म्हणून चांगल्या पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आठवडाभर सरी कोसळल्यानंतर राज्यातून पुन्हा मान्सून गायब होण्याची शक्यता आहे. या काळात
काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. परंतु, पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. काही ठिकाणी
हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात. जुलै महिन्याच्या अखेर वर्तवलेल्या सुधारित अंदाजात म्हटल्यानुसार, ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता होती. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील (August and September) पावसाचा एकत्रित विचार केला असता, राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे (Indian Meteorological Department) वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी दिली आहे.