नवी दिल्ली : वृत्तसांस्था – जोरदार वादळ-वार्यामुळे ताजमहाल प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये झालेल्या वादळी वार्यामुळे मुख्य मकबर्यातील संगमरवरी रेलिंग तुटले असून त्याच्या जाळ्याही पडल्या आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने शनिवारी याबाबत माहिती दिली.
वादळी वार्यामुळे मुख्य मकबर्यातील संगमरवरी रेलिंग तुटले असून त्याच्या जाळ्या पडल्या आहेत. ताजमहाल परिसरातील झाडेही कोलमडून पडली आहेत. त्याशिवाय परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी बनवलेल्या शेडचे फॉल्स सीलिंगही निखळून पडले आहे.
ताजमहालशिवाय महताब बागच्या भिंतीवर झाड पडले आहे. तर मरियम मकबर्यातही झाड पडल्याचे यावेळी सांगण्यात आले. आग्रा आणि जवळील परिसरात जवळपास 100 किमी प्रति तास वेगाने आलेल्या वादळामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झालेत. विशेष म्हणजे लॉकडाउनमुळे ताजमहाल गेल्या 68 दिवसांपासून बंद आहे. इतक्या दीर्घकाळ ताजमहाल बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, वादळामुळे आग्रा आणि जवळील परिसरात अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडले असून काही घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.