बहुजननामा ऑनलाईन
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी मोदींना प्रश्न करत निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपयांचं विमान मागवलं जात आहे, हा न्याय आहे का?” असा सवाल करत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर ट्विटरवरून व्हिडीओ शेअर करत देखील टोला लगावला आहे.
https://twitter.com/
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये जवान एकमेकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. हे जवान ‘नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातं आहे’ असं म्हणत आहेत. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर साधला आहे. ट्विट करत मोदींवर निशाणा साधत गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे कि,”पंतप्रधानांनी आपल्यासाठी 8400 कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. यामध्ये 30 लाख गरम कपडे, 60 लाख जॅकेट-ग्लोव्हज, 67 लाख 20 हजार बूट , 16 लाख 80 हजार ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करता आल्या असत्या. मोदींना केवळ आपल्या प्रतिमेची चिंता असून सैनिकांची नसल्याचा टोला देखील राहुल यांनी लगावला.
https://twitter.com/
दरम्यान, राहुल यांनी अटल टनेलच्या उदघाटनावरून देखील मोदींवर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी बोगद्यात कुणीही नसताना मोदींनी नेमकं अभिवादन कोणाला केलं? असा सवाल राजकीय नेत्यांसह अनेकांनी विचारलाहोता. मोदींचा हात दाखवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनेकांनी निशाणा साधला होता. त्यामुळं आता राहुल यांनी देखील ट्विट करत मोदींना हा प्रश्न विचारला आहे. “पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं आता भाजपकडून राहुल यांच्या ट्विटवर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.